दोन गझला : विजयकुमार देशपांडे


 
१.

आपण काही खरडत नाही 
इतरांचेही भावत नाही..

करती मिळून इतर चांगले 
खीळ घालतो करमत नाही.. 

वरचढ होतो दुसरा कोणी 
पाण्याशिवाय पाहत नाही ..

बोलत नाही आपण काही
दुसऱ्याची री ओढत नाही..

सरकत नाही कधी पुढे तो
मदतीलाही धावत नाही.. 
.
३.

बसलो होतो ती जाता मी डोळे मिटुनी
आठवणींचे पक्षी गेले मनात फिरुनी..

निरोप घेण्या सामोरा मी थांबलो जरा   
किती खुबीने लपवले तिने अश्रू हसुनी..

काही कडवट काही चविष्ट आठवणींना   
घोळत गेलो का मी तिच्याच दारावरुनी..

आसपास तू आहेस सखे नक्की आता
गेले क्षणात सुगंधात मन बघ दरवळुनी..

वाटे कौतुक भेटीचे का अपुल्या त्याला
स्वागतास त्या सज्ज चांदण्या नभ हे भरुनी..
.....................................................

विजयकुमार देशपांडे

No comments:

Post a Comment